पुणे जिल्ह्यातील काँग्रेस जीवंत आहे स्लग
ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे, जिल्हाध्यक्ष देवीदास भंसाळीसह शेकडो कार्यकर्ते साक्षीदार
-थोपटे, भन्साळींनी मेळाव्यात गुंड घुसवलेः कुंजीर यांचा आरोप
-त्यावेळी आपण बाहेर गेलो होतोः निरीक्षक बाबासाहेब धाबेकर
-जिल्हाध्यक्षाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मेळावा
-कुंजीर तक्रार करण्याच्या मनःस्थितीत नाहीत
-पुरंदरमधील गटबाजीचे पडसाद असल्याची चर्चा
-अहिंसेच्या शिकवणुकीचा मान राखत रिवॉल्व्हर काढले नाही
पुणे (प्रतिनीधी)- पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षांच्या निवडणुकीत आज प्रचंड गोंधळ झाला. त्यात पुरंदरचे माजी आमदार संभाजी कुंजीर यांना बेदम मारहाण करण्यात आला. त्यांना काही जणांनी खुर्च्या कुंजीर यांच्या डोक्यात घातल्याने त्या मोडल्या.यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. या हाणामारीने जिल्ह्यातील काँग्रेस संपली नसून जीवंत असल्याचे या निमित्ताने बघायला मिळाले. त्यानंतर विद्यमान अध्यक्ष देवीदास भन्साळी यांची जिल्हा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ...पुढे वाचा
पुणे (प्रतिनिधी)- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्तेत एकत्र आहेत. दोन्ही पक्षांचा अजेंडा सारखाच असतो, तरीही दोन्ही पक्ष कधी दिल्लीत तर कधी गल्लीत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा सतत प्रयत्न करत असतात. खर तर दोन्ही पक्ष फक्त सत्तेसाठीच एकत्र आहेत.एकमेकांवर कुरघोडी करण्याची वेळ आली की निदान पुणे पिंपरी चिचंवडमध्ये आणि क्वचित प्रसंगी मुंबईत सेनाभाजपला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष साथ देतात. ...पुढे वाचा
पुणे शहर हे एका बशीसारखे आहे. शहराच्या चारही बाजूला टेकड्या आहेत का होत्या. त्यामुळे पुण्यात पाण्याचे दुर्भिक्ष कधीच नव्हते. पण गेल्या काही वर्षांपासून त्याचे चटके पुणेकरांना बसायला लागले आहेत. गेली दोन वर्षेतर एक दिवसाआड पाणी घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. हे पाप कुणाचे? ...पुढे वाचा
पुणे (प्रतिनिधी) - पुणे आणि परिसरात गेले पाच दिवस सतत पाऊस सुरू आहे. तसेच धऱणांच्या पाणलोट क्षेत्रातही तो पड असल्याने धऱणाच्या उपयुक्त पाणी साठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे पुणे शहराला आता दिवसातून एकवेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पाटबंधारे खाते आणि महापालिकेचे अधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत घेऊन पुणेकरांना पाणी कपातीपासून दिलासा दिला आहे. ...पुढे वाचा
चेस्टनटबड
आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला मानवी स्वभावांचे विविध पैलू अनुभवायला मिळतात. करारीपणा, कडवटपणा, धडपड्या स्वभाव, आळशीपणा, कोटेकोरपणा असे आणि यासारखेच अनेक मानवी स्वभावाची विविध रूपे आपल्याला अवतीभोवती दिसतात. ...पुढे वाचा